Advertisement

अखेर ६०:४० पॅटर्नला स्थगिती, 'लॉ'च्या विद्यार्थ्यांना दिलासा

या याचिकेवर झालेल्या सोमवारी २ तास झालेल्या सुनावणीत न्यायलयाने विद्यापीठात शिक्षक, परीक्षेचं वेळापत्रक, अभ्यासक्रम, यांसह इतर गोष्टीच कोणत्याही नियोजन नसताना विद्यापीठ ही परीक्षा कशी सुरू करू शकतं, असा प्रश्न उपस्थित केला. त्याशिवाय २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील परीक्षा जुन्या पद्धतीनुसारच घेण्याचे निर्देशही विद्यापीठाला देण्यात आले आहेत.

अखेर ६०:४० पॅटर्नला स्थगिती, 'लॉ'च्या विद्यार्थ्यांना दिलासा
SHARES

मुंबई विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 'लॉ' (विधी) अभ्यासक्रमाच्या परीक्षा पद्धतीत बदल करून सुरू केलेल्या ६०:४० या नव्या पॅटर्नला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या 'लॉ' शाखेच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


याचिका कुणाची?

मुंबई विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून विधी अभ्यासक्रमासाठी जुन्या परीक्षा पद्धतीत बदल करून ६०:४० असा नवीन पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या पॅटर्नला विद्यार्थी संघटना कडाडून विरोध दर्शवत असूनही या परीक्षा पद्धतीवर विद्यापीठ प्रशासन मात्र ठाम होतं. त्यामुळे या पॅटर्नविरोधात 'स्टुंडट लॉ काऊन्सिल'चे अध्यक्ष सचिन पवार यांनी ९ आॅक्टोबरला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत मुंबई विद्यापीठाचा कारभार सुधारत नसेल, तर विद्यापीठाला थेट टाळं ठोका, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने विद्यापीठाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.


२ तास सुनावणी

या याचिकेवर झालेल्या सोमवारी २ तास झालेल्या सुनावणीत न्यायलयाने विद्यापीठात शिक्षक, परीक्षेचं वेळापत्रक, अभ्यासक्रम, यांसह इतर गोष्टीच कोणत्याही नियोजन नसताना विद्यापीठ ही परीक्षा कशी सुरू करू शकतं, असा प्रश्न उपस्थित केला. त्याशिवाय २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील परीक्षा जुन्या पद्धतीनुसारच घेण्याचे निर्देशही विद्यापीठाला देण्यात आले आहेत.


परीक्षा पद्धतीतील गोंधळ काय?

केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगानुसार, मुंबई विद्यापीठानं श्रेयांक श्रेणी पद्धत सुरू केली आहे. या पद्धतीत गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्याच वेळा बदल करण्यात आला असून काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा या पद्धतीत बदल करण्यात येत असल्याचं परीपत्रक मुंबई विद्यापीठानं काढलं होतं. या परीपत्रकानुसार आता परीक्षेत ६०:४० ही पद्धत वापरण्यात येणार असून 'लॉ' शाखेमध्ये ही पद्धत सुरू करण्यात आली. या नव्या पद्धतीनुसार 'लॉ' शाखेत ६० गुणांच्या परीक्षेत १८ गुण मिळवणं तर, ४० गुणांच्या परीक्षेत १२ गुणांची अट ठेवण्यात आली.


वेबसाईटवर याचिका

या निर्णयाविरोधात 'लॉ' काऊन्सिलने प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र देऊन हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंतीही केली होती. त्यानंतर change.org या वेबसाईटवर ही ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली असून ८६० विद्यार्थ्यांच्या सह्या करून हा नवा पॅटर्न रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र विद्यापीठानं अद्याप कोणतही पाऊल न उचलल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.


मुंबई उच्च न्यायलयाने 'लॉ'च्या विद्यार्थ्यांसाठीच्या परीक्षा पद्धतीतील ६०:४० पॅटर्नला तूर्तास स्थगिती दिली आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे कॉलेजच्या मनमानी पद्धतीला आळा बसला आहे. या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठ प्रशासनाने ६०:४० पॅटर्न रद्द झाल्याचं परीपत्रक लवकरात लवकर काढावं.
- सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कॉऊन्सिल



हेही वाचा-

तर मुंबई विद्यापीठाला टाळं ठोका, मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी

लॉ च्या नव्या परीक्षांविरोधात विद्यार्थी कोर्टात; १९ ऑक्टोबरला सुनावणी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा