दादर- नोटाबंदीच्या निर्णयानंतर सामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा हटवण्यात आली आहे. एटीएममधून कितीही पैसे काढता येणार असल्याने सामान्य नागरिक कॅशलेस व्यवहाराला पसंती देतील की रोख रक्कम देणेच पसंत करतील? यासंदर्भात ‘मुंबई लाइव्ह’ने सामान्यांशी बातचीत केलीय. काही लोकांनी कॅशलेस व्यवहारालाच पसंती दर्शवली. तरी काहिंनी छोट्या खरेदीवरती कॅशलेस व्यवहार नको असंही मत व्यक्त केले.