युक्रेन आणि रशियामधील युद्धासारख्या स्थितीमुळे राज्यातील १२०० विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. बुधवार, २३ फेब्रुवारी रोजी, महाराष्ट्राचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री, उदय सामंत यांनी ट्विटरवरही माहिती दिली.
सामंत यांनी या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी तातडीनं हस्तक्षेप करण्याची विनंती केली. ते पुढे म्हणाले की, इतर संसाधनांसह फ्लाइटची उपलब्धता नसल्यामुळे राज्यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून आहेत.
1200 students from Maharashtra are stuck up in Ukraine due to a War like situation between Russia and Ukraine. Request urgent intervention to bring back these students safely in Maharashtra @PMOIndia @DrSJaishankar @AmitShah pic.twitter.com/HdaB2ksiSS
— Uday Samant (@samant_uday) February 23, 2022
शिवाय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या (CM) सचिवालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत आणि त्यामुळे सुरक्षेबाबत केंद्राशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय व्यवस्था करण्यात येत आहे आणि त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी समन्वय साधला पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला विद्यार्थ्यांना विशेषत: युक्रेनमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यास सांगितले.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून उद्योग, शिक्षण आणि व्यवसायासाठी गेलेल्या लोकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारशी समन्वय साधून त्यांच्याशी संपर्क ठेवण्याच्या सूचना त्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.
हेही वाचा